ही पश्याताप करण्याची सवय आपल्या मनात इतकी खोलवर रुजलेली आसते की ती आपल्या प्रत्येक निर्णयावर परिणाम करते । आपण नकाळत पने आपल्याच निर्णयावर शंका घेतो । आपण बरोबर की चुक हे सुध्दा आपण ठरवू शकत नाही। थोडक्यात आपण स्वताला वैचारिक गोंधळात टाकतो। आपण आपली निर्णय क्षमाताच गमावून बसतो ... मग या रिग्रेट्सच्या बैचेनीतुन बाहेर पडण्याचा काही उपाय आहे?
रविवार, ११ जानेवारी, २००९
नो रिग्रीट्स -२
मनाला सतत टोचणी देनार्र्या या घटना आपल्याला सतत पश्यताप दग्ध बनवत आसतात, आणि हळूहळृ हा पश्याताप आपल्या आयुष्याचा आणि नंतर आपल्या स्वभावाचा जणू भागच बनुन जातो । हा पश्याताप मग प्रत्येक वेळी आपल्या कृतीतून व्यक्त व्हायला लागतो । ही कृति म्हणजे या पश्यातापाचेच वेगवेगळे भावः आसतात । ते कधी राग बनुन तर कधी निराशा, तिरस्कार , लोभ , हव्यास , मस्सर, तर कधी व्यसनांच्या रुपाने बाहेर पडतात । त्यासाठी कोणतीही साधी घटना सुध्दा पुरेशी ठरते , मग आपली बस लेट झाली आसो किवा कुणाच्या आपेकश्या पूर्ण करू शकलो नाही म्हणुन आसो , हा रिग्रेट्स आपल्या पचविलाच पुजलेला आसतो । किबहूना या पश्यातापांच्या वेगवेगळया भावांच्या रुपाने बाहेर पडून आपले जीवनच जणू झाकाळून टाकतात ।
नो रिग्रेट्स -१
आपण जेव्हा एकांतात आपल्या जीवनात घडलेल्या घटनांचा मागोवा घेत आसतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर नकळतपणे आयुष्यात घडलेल्या चांगल्या आणि दुखद घटनांचा जणू चित्रपटच उभा राहतो । या घट्नांपैकी काही क्षण हे जर वेगळ्या पध्दतीने घडले आसते किवा जगता आले आसते तर किती चांगले झाले आसते... आसे आपल्याला वाटते । या आश्या घटना आसतात ज्या मनाला सतत सलत आसतात ,ज्यांची बोचनी आपल्या मनाला सतत अस्वथ्थ करीत राहते । या आश्या आठवणी आसतात ज्या सतत आपला नकळतपणे पाठलाग करीत आसतात , आपल्याला भुतकाळात घेवून जात आसतात , ज्यांच्या बददल आल्याला सतत रिग्रेटस ( पश्यताप ) वाटत राहतो ।
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

