माझ्या आवर्तन या कविते विषयी मला वाचकांच्या प्रतिक्रया मिळाल्या। खुप वाचकाना ही कविता म्हणजे ब्रेक अप थॉट वाटला॥ सेलिब्रेशन ऑफ़ ज़ाँय मधे एवढे दुख का , आसेही काहिना वाटले त्याचासाठी हे निरूपण ।
ह्या कवितेचा जन्म झाला तो एका दुखातुनच। पुण्याला जंगली महाराजांच्या मंदिरात मला ही कविता सुचली । एक दिवस संध्याकाळी मी जंगली महाराजानच्या मंदिरात बसलो होतो । तेव्हा कुणीतरी एक भक्त मंदिरात आला । बाहेरुनच त्याने हात जोडले आणि तो रडायला लागला । तसाच रडत तो मंदिरात गेला आणि महाराजांच्या समाधीवर डोके ठेवून आपल्या आश्रुना त्याने वाट मोकळी करून दिली । थोड्या वेळानंतर तो आला तेव्हा तो खुप शांत होता। आगदी शांत समुद्रासारखा ....त्याला आसे कोणते दुख होते ज्याने तो इतका धाय मोकलून रडला आसवा याचा विचार करायला जेव्हा मी सुरवात केली तेव्हा त्याचे जे उत्तर मला मिळाले ते म्हणजे ही कविता...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा