रविवार, ११ जानेवारी, २००९

नो रिग्रेट्स -४

या सर्व रिग्रेट्सच्या भावनांतुंन बाहेर पडण्याचा ऊपाय नक्कीच आहे । तो म्हणजे योग्य 'कृति' ... जिचा निर्णय सर्वस्वी तूम्हीच घेतला आसेल, ज्या निर्णयाने होणार्र्या सर्व परिणामांची जबाबदारी स्विकारन्याचीआपली तयारी आसेल ... ही जबबदारीच तुम्हाला तुमची निर्णय क्षमता परत मिळवुन देइन । मग जरी तुम्ही आसा निर्णय घेतला आसेल ज्यामुळे इतराना बरे वाटणार आसेल मात्र तुम्ही त्याची जबाबदारी घेतल्याने त्याच्या सर्व बरे आणि वाईट परिनामांना सामोरे जाण्याची आपली आपसुकच मानसिकता होते। मग हा निर्णय योग्य आहे का अयोग्य हे कसे ठरवावे ? खुप सोप्प आहे । जो निर्णय आपण घेणार आसतो त्याची सर्वात प्रथम प्रतिक्रिया ही आपले मनच आपल्याला देत आसते। मात्र यात कधी कधी होकर किवा नकार या दोघानमधुन नेमका कोणता पर्याय निवडावा हा प्रश्न आसतो । आश्या वेळी प्रत्यक्ष निर्णय देन्यापुर्वी कोंणतातरी एक निर्णय , होकरार्र्थी किवा नकारार्र्थी घेवून टाकावा । नंतर फक्त या निर्णयाने आपल्या कृतीवर काय परिणाम होतो ते बघावे । आपण जर तो निर्णय खरच मनापासून घेतला आसेल तर पश्यातापंची वेगवेगळी रुपे (राग ,मस्सर,आगतिकता ..... ) आपल्याला छळत नही । आणि आपण 'नो रिग्रेट्स' या स्टेट मधे आसतो। आणि आपण घेतलेला निर्णय योग्य आहे याचे हे प्रतिक आसते ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: